तुमचे बँक खाते बंद असेल. तर, तुमच्या कामाची बातमी आहे. RBI कडून नवीन अपडेट !
RBI News in Marathi
RBI News in Marathi : मित्रांनो, आरबीआयकडून आपल्यासाठी एक नवीन बातमी येत आहे. ती बातमी तुमच्या बँक खात्याबद्दल आहे. आरबीआय आपले बंद असलेले खाते हे तुम्ही वापरत आहात का नाही ? यासाठी, आरबीआय बँक कडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे.
जर, तुमचे बँक खाते हे बंद झालेले असेल. तर, ते कोणत्याही बँकेमध्ये असले, तरी अशा ग्राहकांसाठी आरबीआय बँकेने मोठा खुलासा करुन दिला आहे. की, आरबीआय बँक ने यापुढे कोणत्याही ग्राहकांनी आपल्या बँक खात्यावर एकही रुपया शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड हा आकारण्यात येणार नाही. आणि जर तुम्ही तुमच्या बँक खात्यावरून सलग 2 वर्ष कोणत्याही प्रकारचा व्यवहार केलेला नसेल. तर, तुमचे बँक खाते हे बंद झालेले असेल. तर तुम्ही तुमच्या खात्यावर एकही रुपया शिल्लक न ठेवल्याबद्दल बँक तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा दंड आकारू शकत नाही. हे नियम बँकेने 1 एप्रिल पासून लागू होतील असे स्पष्ट केले आहे.
या आरबीआय बँकेचे नियम कसे आहेत ?
या बंद झालेल्या खात्यांपासून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हे खाते शोधणे अधिक गरजेचे आहेत. तुमची बंद झालेले खाते ही पुन्हा सुरू झाल्यावर तुम्हाला कमीत कमी 6 महिने त्या खात्याशी व्यवहार करावा लागेल. व या तुमच्या खात्याकडे आरबीआय बँक बारीक लक्ष ठेवून राहील. त्यामुळे तुमचे व इतर ग्राहकांचे आर्थिक नुकसान हे होणार नाही.
तुमचे बँक खाते हे पुन्हा सक्रिय करा
सर्व लहान व मोठ्या बँकांपर्यंत समाविष्ट या नियमांमध्ये केल आहे आरबीआचा नियम एक एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. या आरबीआय बँक ने म्हटले आहे. की, ग्राहकांचा हा कार्यकाळ वाढण्याचे लक्ष जाणीवपूर्वक ठेवले पाहिजे. खाते पुन्हा उघडल्यानंतर ग्राहकाने आपली रक्कम काढली किंवा कमी केल्यास त्यांनीं 6 महिन्याच्या आतमध्ये असं केल्यास बँकेने त्या ग्राहकास विचारपूस करावी. या खात्यात हस्तक्षेप केला नाही. तर, बँकेला त्याची माहिती द्यावी लागेल. आणि जर खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचा नोमिना शोधणे हे देखील बँकेचे काम आहे. तर आरबीआयने या बँकांना सूचना जारी केल्या आहेत.
बँक ह्या शुल्क वसूल करणार नाहीत.
तुमचे बँक खाते हे पुन्हा चालू करण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाही. असे रिझर्व बँकेने म्हटले आहे. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये शिल्लक एकही रुपया न ठेवल्यास बँक तुमच्यावर कोणताही दंड आकारू शकत नाही. आणि जर तुमची खाते बंद असेल. तर, त्यावर बँका ह्या व्याज देत राहतील. इकॉनोमिक टाइम्सच्या अहवालानुसार बँक खात्यांची आरबीआय बँकेने ओळख करण्यासाठी वार्षिक पुनरावलोकन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यात वर्षभरात कोणतेही व्यवहार झालेले नाहीत.