Maharashtra Rain News | राज्यातील या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस, हवामान विभागाचा नवीन अंदाज जारी

0
Maharashtra Rain News

Maharashtra Rain News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेले आहे. उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मान्सूनचे आगमन होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. उष्माघाताने अनेक ठिकाणी काही घटना घडलेल्या देखील आढळलेले आहेत. अशातच नागरिकांना आनंदाची आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये लवकरच होणार आहे.Maharashtra Rain News

परंतु हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यसह विजांच्या कडकडाटासह पावसाचे लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पालघर आणि ठाण्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानावर असून हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे असणार आहे.

या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, गोंदिया, नागपूर, आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. व येथील नागरिकांनी सतर्क राहावे.

या जिल्ह्यामधी येलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

दुसरीकडे नागरिकांसाठी एक दिलासादयक बातमी हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस राज्यात मान्सूनचे आगमनाची शक्यता आहे. पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!