या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसाठी 596 कोटी रुपये मंजूर, सरकारचा मोठा निर्णय!

0
Compensation For Crop Damage

Compensation For Crop Damage

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Compensation For Crop Damage: नमस्कार शेतकरी मित्रांनो, जानेवारी ते मे या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी मदत देण्यासाठी राज्य शासनाने 596 कोटी 21 लाखाचा निधी मंजूर केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारेल.

किती हेक्टर पर्यंत मिळणार मदत?

राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती पासून शेती पिकाचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून आता दोन हेक्टर एवजी तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे. Compensation for crop damage

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवकाळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उद्धान व अक्षय आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण आखले आहे. अवकाळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाचे नुकसान भरून काढण्यासाठी दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.

जानेवारी ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे शेतमालाचे झालेल्या नुकसान भरपाई साठी निधी मागण्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे प्राप्त झाले होते. या प्रस्तावाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार लाभार्थ्यांना नुकसान भरपाई चे पैसे थेट त्यांचे बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!