Mahavitran News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील महावितरण कंपनीने सर्व शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महावितरणाच्या परिमंडळात लाखो कृषी पंप धारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
शासन शासनाने याबाबत घोषणा केली आहे, मात्र शासनाकडून अजून महावितरण ला वीज बिल माफी संदर्भात कोणत्याही आदेश पत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे वसुली बाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. विज बिल माफ होणार आहे या आशेवर शेतकरी देखील वीज बिल भरण्यास नाकार देत आहेत.
राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुकी होणार आहेत. त्यापूर्वी राज्य शासनाने त्यांच्या शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत विज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी कुठेतरी असे ची किरण निर्माण झाली आहे.
महावितरणच्या नाशिक परिमंडळात नगर जिल्हा मोडत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात तीन लाख 54 हजार 77 कृषी उत्पादक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. त्याचबरोबर नगरमध्ये ही संख्या चार लाख 843 इतकी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या घोषणेचा मोठा फायदा होणार आहे. Mahavitran News
राज्य शासनाने कृषी पंपाच्या थकीत वीज बिलांना माफी दिली असली तरी याबाबत लेखी आदेश महावितरणाला अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे घोषणाची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी कशी करायची? कधीपासूनच्या थकीत बिलासाठी ही योजना लागू असेल, तसे आदेश हाती नसल्याने तात्पुरती वसली बाबत काय भूमिका घ्यायची असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
महावितरणाची थकबाकी
महावितरणाच्या नाशिक परिमंडळात सध्याच्या स्थितीत कृषी विज पंपाची थकबाकी 8498.23 कोटी रुपये इतकी आहे. त्यामध्ये नगर जिल्ह्यात सर्वाधिक 5116.40 कोटी रुपये शेतकऱ्यांकडे अडकले आहेत. तर नाशिकमध्ये थकबाकीची रक्कम 3381.23 कोटी रुपये इतकी झाली आहे.
- नगर ग्रामीण – 1277.20 कोटी
- नगर शहरी – 659.72 कोटी
- कर्जत – 1243.66 कोटी
- श्रीरामपूर – 669.24 कोटी
- संगमनेर – 1296.58 कोटी
- कळवण – 269.95 कोटी
- मालेगाव ग्रामीण – 428.22 कोटी
- मनमाड – 494.79 कोटी
- सटाणा – 408.96 कोटी
- चांदवड – 659.82 कोटी
- नाशिक ग्रामीण – 848.74 कोटी
- नाशिक शहर – 2.23 कोटी
- नाशिक शहरी- 269.12 कोटी
सौर कृषी पंपातून वीज पुरवठा
मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेच्या माध्यमातून दिवसात दहा तास अखंडित वीजपुरवठा देणार आहे. शासनाची ही महत्त्वाकांशी योजना असून त्यात शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. योजनेसाठी आवश्यक जमीन असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्य प्रक्रियेचा काम सुरू आहे. शेतकऱ्यांना सौर विजेचे प्रतीक्षा लागली आहे.
3 thoughts on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील या शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे संपूर्ण वीजबिल माफ, यादीत तुमचे नाव पहा, वाचा सविस्तर”