सोयाबीन व कापसाच्या पिकांना 27 हजार रुपये अनुदान मिळणार? सरकारची मोठी घोषणा..! Subsidy for soybean and cotton crops


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Subsidy for soybean and cotton crops: नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अघोडी वेळेसच पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे आणखीन पिकाचे नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेले पीक वाया गेल्यामुळे शेतकरी सरकारकडे मोठ्या अशाने पाहत आहे.

अशाच परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसार आता विरायत म्हणजेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादीपर्यंत मदत मिळत होती. आता ती वाढवून तीन हेक्टरच्या क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत मदत दिली जाणार आहे. आणि प्रत्येक हेक्‍टरी तेरा हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे.

आतापर्यंत राज्यात 34 जिल्ह्यातील सरासरी 24 लाख शेतकऱ्यांची शेती पिकाचे पंचनामे हे सरकारकड जमा करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे तेथील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळणार नाही.

हे पण वाचा:- या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 26500 रुपये हेक्टरी सोयाबीन पीक विमा, पहा सविस्तर माहिती

Subsidy for soybean and cotton crops

उर्वरित जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन व कापूस पिकाची नुकसान झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टर च्या मर्यादीपर्यंत मदत दिली जाणार आहे. जर आपण कापूस पिकासाठी दोन हेक्टर क्षेत्र पंचनामे नोंदवले असेल तर आपल्याला नक्कीच 27 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

आता जाहीर केलेल्या सरकारच्या निर्णयाची राज्यामध्ये लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. जर शेतकऱ्याच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असेल आणि ते नुकसान पंचनामेद्वारे तलाठ्या मार्फत नोंदवण्यात आले असेल तर नक्कीच आपल्याला जेवढे क्षेत्र नोंदवले आहे तेवढी रक्कम मिळणार आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. येणार काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जमा करण्यात येणार आहे. जिरायत पिकासाठी आतापर्यंत हेक्टरी 8500 रुपये मदत दिली जात होती परंतु ती वाढवून 13500 रुपये प्रति हेक्टर करण्यात आले आहे.

आत्ताच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोयाबीन आणि कापसाला अनुदान देण्याची घोषणा केली. या गोष्टीप्रमाणे कापूस आणि सोयाबीनला या पिकाला खरच अनुदान मिळणार का याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे. त्याच प्रमाणे इतर पिकांच्या नुकसान भरपाई मध्ये देखिल वाढ करण्यात आली आहे. बागायत पिका साठी हेक्टरी 27000 पर्यंत मदत दिली जात होती. परंतु ती आता वाढून 36000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत दिली जाणार आहे.

हे पण वाचा:-कर्जमाफी योजनेतून हे शेतकरी होणारा अपात्र..! कर्जमाफीची नवीन यादी जाहीर, पहा सविस्तर माहिती

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!