Ration Card : रेशन कार्ड हे भारतातील गरिबांसाठी अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्ड वापरलं जातं. मात्र सध्या सर्व रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सरकारकडून रेशन कार्ड केवायसी (KYC) अनिवार्य करण्यात आली आहे आणि त्यासाठी केवळ ५ दिवसच शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही हे काम वेळेत पूर्ण केलं नाही, तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं आणि भविष्यात मोफत धान्य मिळणं बंद होईल. Ration Card
सरकारने आधी रेशन कार्ड KYC साठी अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ जाहीर केली होती. मात्र नंतर ती वाढवून ३० एप्रिल २०२५ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लगेचच ही प्रक्रिया पार पाडावी, अन्यथा भविष्यात तुमचं नाव रेशन योजनेतून वगळलं जाऊ शकतं. रेशन कार्ड रद्द झाल्यास मोफत तांदूळ, गहू, साखर किंवा इतर धान्य मिळणं थांबेल आणि त्यामुळे अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
ज्यांनी KYC केली नाही, त्यांना मिळणार नाही मोफत धान्य
KYC ही ओळख पडताळणी प्रक्रिया असून, तिच्या मदतीने सरकार नकली कार्डधारकांना बाहेर काढू शकते आणि गरजूंनाच योजनेचा लाभ मिळवून देऊ शकते. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की, फक्त KYC केलेल्या नागरिकांनाच योजना मिळणार आहे. केवायसी न केलेल्या रेशन कार्डधारकांचे नावे हटवली जातील. यामुळे शासकीय लाभ मिळवणं कठीण होईल.
KYC प्रक्रिया कशी करावी? (Online आणि Offline दोन्ही पद्धती)
ऑनलाइन पद्धत:
1. सर्वप्रथम Aadhaar FaceRD अॅप डाउनलोड करा.
2. त्यानंतर लोकेशन ऑन करा.
3. आधार नंबर, कॅप्चा कोड आणि OTP टाका.
4. पुढे Face e-KYC हा पर्याय निवडा.
5. त्यानंतर तुमचा फोटो स्कॅन करून अपलोड करा.
6. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमची KYC यशस्वी होईल.
ऑफलाइन पद्धत:
तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊनही KYC करू शकता.
यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत न्यायचं आहे.
दुकानदार तुमची ओळख पडताळणी करून सिस्टममध्ये नोंद करेल.
हे लक्षात ठेवा:
शेवटच्या तारखेची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा. कारण शेवटच्या काही दिवसांत वेबसाइट्स स्लो होतात, रेशन दुकांनांमध्ये गर्दी होते आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया लांबू शकते. त्यामुळे उरलेल्या ५ दिवसांत रेशन कार्ड KYC पूर्ण करून योजनेचा लाभ चालू ठेवण्याची हीच योग्य वेळ आहे.
हे पण वाचा | रेशन कार्डधारकांनो 15 फेब्रुवारी पर्यंत ई-केवायसी करा नाहीतर मिळणार नाही रेशन