महाराष्ट्रातील या भागात होणार अतिवृष्टी! पंजाबराव डख यांनी सांगितले स्पष्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Hawaman Andaj: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील आठ पंधरा दिवसात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्राच्या परिसरात आणि विदर्भात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. जवळपास मागील पंधरा दिवसापासून राज्यात पावसाचे बरसने सुरू आहे. पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. मुंबई तुफान पाऊस झाला तर पुण्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र ठीक ठिकाणी पावसाने चांगलाच गोंधळ उडाला आहे. मागील पंधरा दिवसापासून राज्यात सूर्याचे दर्शन झाले नाही. मुंबई पुण्यासारखी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये देखील पाहायला मिळाले आहे. विदर्भातही पावसाचा जोर चांगलाच वाढला होता मात्र आता विसरला आहे. गडचिरोली मध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला.

अशा परिस्थितीत आता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक नवीन अपडेट दिली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठ दिवस मराठवाड्यात बरोबर पावसाची परिस्थिती दिसणार आहे. म्हणजेच पुढील आठ दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. Panjabrao Dakh Hawaman Andaj

त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील पाच ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या काळात राज्यात दररोज एक दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात रिमझिम तर काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

पुढील आठ दिवसात राज्यातील कोकण पूर्व आणि पश्चिम विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात चांगला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मराठवाड्यात मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याची माहिती डख यांनी दिली. एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मुंबई आणि पूर्व ते पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये पाच ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील या भागात दिवस बदलत रोज थोडा थोडा पाऊस पडणार आहे. पंजाबराव प्रमाणेच राज्यातील हवामान खात्यातील काही तज्ञांनी देखील राज्यातील ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे खानदेश वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्र मध्ये आज पासून दोन दिवस म्हणजेच दोन ऑगस्टपर्यंत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात मात्र एक ऑक्टोबर पासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात तीन ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर असल्याची माहिती पंजाबराव यांनी दिली.

तसेच धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्या मध्ये तीन ऑक्टोबर पर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. कोकणातील सर्वच्या सर्व सात जिल्ह्यांमध्ये तीन ऑगस्टपर्यंत अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असे मत हवामान खात्यातील तज्ञ व्यक्ती यांनी दिली आहे.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा