LIC Policy | एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे या कंपनी अंतर्गत नागरिकांना बक्कळ पैसे कमवण्याची संधी निर्माण झाली आहे. तुम्ही विमा कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरघोस परतावा व सुरक्षा देखील मिळते.
आजच्या काळामध्ये गुंतवणूक खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण येत्या काळामध्ये हीच गुंतवणूक तुम्हाला डबल किंवा ट्रिपल नफा मिळवून देणार आहे. कधी अडचणीच्या काळामध्ये पैशांची गरज भासते सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक फार महत्त्वाची मानली जाते.
त्यासाठी गुंतवणूक कुठे करायची कशी करायची व कोणत्या योजना गुंतवणुकीसाठी योग्य आहेत. याची देखील खात्रीशीर माहिती असणे महत्त्वाचे आहे. एलआयसी त्यांच्या ग्राहकांसाठी प्रत्येक गोष्टींची गरज लक्षात घेऊन अनेक अशा योजना चालवते. ग्राहकांसाठी अशीच एक खास योजना एलआयसी ने आखली आहे. ही योजना म्हणजे जीवन आझाद पॉलिसी. या योजनेअंतर्गत ग्राहकांना वाईट काळामध्ये मदत देण्यात मदत करते. LIC Policy
जर तुम्ही एलआयसी द्वारे चालवल्या जाणाऱ्या गुंतवणूक करून फायदे मिळवायचे असेल तर आजच आमचा हा लेख सविस्तरपणे वाचा आझाद पॉलिसी या योजनेमध्ये अनेक प्रकारे गुंतवणूक केली जाते ग्राहकांना संरक्षण आणि बचत या दोन्ही योजनेचा लाभ मिळतो.
जबरदस्त फायदे देणारी या योजनेमध्ये तुम्हाला आठ वर्षासाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागेल जर एखादी जीवन आजाद पॉलिसी वीस वर्षासाठी खरेदी केली असेल तर पॉलिसीधारकांना 20 वर्षासाठी बारा वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल तर 18 वर्षे जुन्या पॉलिसी साठी दहा वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल.
या पॉलिसीच्या योजनेमध्ये एकदा प्रीमियम खरेदी केल्यावर ग्राहकांना ग्राहक मासिक त्रिमासिक अर्धवार्षिक आणि वार्षिक प्रीमियम पेमेंट पर्यायांमधून निवड करता येणार आहे. जर तुम्ही ही योजना खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जीवन आजाद पॉलिसीमध्ये किमान विमाची रक्कम दोन लाख रुपये आहे. आणि कमाल विम्याचे रक्कम 5 लाख रुपये इतकी आहे.
जर तुम्हाला तीस वर्षाच्या ग्राहकांनी ही योजना 18 वर्षासाठी घेतली तर त्याने दोन लाख रुपयांची विमा रक्कम घेतली तर त्याला दहा वर्षासाठी फक्त 12हजार 38 रुपये जमा करावे लागणार आहेत. त्याच ग्राहकांना पॉलिसीमध्ये कर लाभ देखील मिळणार आहेत.
2 thoughts on “LIC Policy: एलआयसीची ही धमाकेदार योजना एकदा गुंतवणूक केल्यास आयुष्यभर मिळणार परतावा”