Free Electricity | शेतकऱ्यांच्या हित झोपण्यासाठी राज्य सरकार अनेक अशा योजना राबवत असते. आता उत्तर प्रदेश मधील योग्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत वीज दिली आहे.
उत्तर प्रदेश मधील सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक अशा योजना राबवत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, ते म्हणजे मोफत वीज. ज्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयाचा उत्तर प्रदेशातील जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
2022 मध्ये उत्तर प्रदेश येथे झालेल्या विधानसभा निवडणूक मध्ये शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येईल असे, आश्वासन दिले होते व त्यांनी आता बैठकीनंतर ती पूर्ण केले असे म्हटले आहे.
शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज
महाराष्ट्रातील बोरवेल आणि विहिरींद्वारे एकत्रितपणे सिंचन होते. याउलट उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांकडे बोरवेलच्या माध्यमातून थेट सर्वाधिक सिंचन केले जाते. तसेच उत्तर प्रदेशांमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी बोरवेल पर्यायांनी शेताला पाणी दिले जाते.
ज्यामुळे योगी सरकारने शेतकऱ्यांच्या बोरवेल साठी संपूर्ण वीज मोफत केलेली आहे. व याची घोषणा त्यांनी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केली. व यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही प्रकारचे वीज बिल आकारण्यात येणार नाही, अशी देखील मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
यासाठी अर्थसंकल्पनामध्ये 2400 कोटींची तरतूद
दरम्यान, उत्तर प्रदेश मधील सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना आता बोरवेलवर यावर वापरली जाणारी विज साठी कोणतेही बिल आकारले जाणार नाही, शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार आहे.
यासाठी दुसरा कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प 5 फेब्रुवारी विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेला होता. ज्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यासाठी 2400 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली आहे.
शेतीमधून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी पाणी वीज यासारख्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यासाठी शेतकऱ्यांना मोठे कष्ट भोगावे लागतात.
शेतीमध्ये जितके महत्त्व सुपीक जमिनीला आहे तितके महत्त्व विजेला आहे. वेळेवर वीज आणि पाणी उपलब्ध होत नसल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.
वेळेवर पाणी आणि विज उपलब्ध होत नसल्यामुळे योग्य ते उत्पादन मिळत नाही. हाच प्रश्न डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोफत वीज दिली आहे व शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.