Baba Vanga Predictions On Screentime : जगात असे काही व्यक्तिमत्वं होऊन गेलेत, ज्यांच्या शब्दांनी काळाच्या पुढचं चित्र रंगवलं होतं. अशीच एक अंध अत्तर, ज्यांनी डोळे नसतानाही भविष्याचा वेध घेतला ती म्हणजे बाबा वेंगा. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारा आणतात. 9/11 चा हल्ला असो, दुसऱ्या महायुद्धाचा अंदाज असो, की त्सुनामीसारखा महाभयंकर निसर्गकोप वेंगाचं नाव आजही गूढतेनं घेतलं जातं. पण ज्याचं आजच्या तरुण पिढीला, विशेषतः स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या जनतेला अधिक विचार करायला लावेल, असं भाकीत त्यांनी केलं होतं ते आता खरं ठरतंय.Baba Vanga Predictions On Screentime
बाबा वेंगाने आपल्या मृत्यूपूर्वी भाकीत केलं होतं की, 2022 नंतर जगभरात लोक एका लहान यंत्रावर पडीक राहतील, ज्यातून प्रकाश झळकतो आणि त्यावर चित्रं व व्हिडिओ दिसतात. आज आपल्या हाती असलेला स्मार्टफोन हाच तो लहान यंत्र. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही अशा विविध स्क्रीनवर आजच्या काळात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण सतत नजर लावून बसलेला दिसतो. कामाच्या नावाखाली, मनोरंजनाच्या नावाखाली, मोकळ्या वेळेत सतत स्क्रीनवर डोळे लावले जात आहेत, झोपेचा वेळ जातोय, मेंदूवर ताण येतोय, आणि नकळत हे यंत्र आपल्या आयुष्याचं नियंत्रण घेऊन बसलंय.
भारत सरकारच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने नुकताच एक अहवाल सादर केला. त्यात असं स्पष्ट झालं की, 24 टक्के लोक झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरतात, तर तब्बल 37 टक्के मुलं गरजेपेक्षा जास्त वेळ स्क्रीनकडे बघतात. याचा परिणाम म्हणून मुलांची चिडचिड वाढलीय, एकाग्रता कमी झालीय, नैराश्य वाढतंय. अभ्यास, संवाद, झोप सर्वच गोष्टी स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या जीवनशैलीमुळे धोक्यात आल्या आहेत.
बाबा वेंगाच्या आणखी एका भविष्यवाणीचा आता जगभर गवगवा आहे ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI). त्यांनी पूर्वीच सांगितलं होतं की, यंत्रे मानवाच्या बुद्धीला मागे टाकतील आणि अनेक क्षेत्रांत वर्चस्व गाजवतील. आजचं वास्तव पाहिलं तर, आरोग्य, शिक्षण, व्यापार, कायदा प्रत्येक ठिकाणी AI चं साम्राज्य पसरलेलं आहे. डॉक्टरांपेक्षा वेगाने निदान करणारी तंत्रं, शाळांमध्ये शिक्षकांची जागा घेतलेले AI टूल्स, आणि कस्टमर केअरमध्ये माणसांऐवजी बोलणारी यंत्रं हे सगळं पाहता बाबा वेंगाचं भाकीत खरं वाटतंय.
आजच्या काळात आपल्या हातातला स्मार्टफोन म्हणजे फक्त एक साधन राहिलेलं नाही, तर त्याने आपल्याला गुंतवून ठेवलंय. आपली झोप, आपली शांती, आपलं मानसिक आरोग्य या सगळ्या गोष्टी या लहान यंत्रामुळे हादरत आहेत. बाबा वेंगाचं हे जुना काळातलं भाकीत आता विचार करायला भाग पाडतंय की “ही प्रगती आहे की अधःपतनाची सुरुवात?” ग्रामीण भागातही आता मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो, आईवडील कामात असताना मुलं स्क्रीनवर गुंतून बसतात हे चित्र दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललं आहे. त्यामुळे या भविष्यवाणीला केवळ गूढतेचा भाग न समजता एक इशारा म्हणून पाहणं गरजेचं आहे.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही. योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या)
हे पण वाचा | आजचे राशीभविष्य- मकर संक्रांती दिवशी या राशींचे भाग्य उजळणार