Thursday

13-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांना मिळणार चार हजार रुपये अनुदान परंतु त्वरित करा हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक कोटी 66 लाख 65 हजार रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. जर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल तर काय करावे लागेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना नुकसान देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपये मिळणार आहेत

यवतमाळ जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना वी के क्रमांकावरून आपले नाव तसेच अनुदानाची रक्कम स्वतः चेक करता येईल असे तहसीलदार यांनी सांगितले आहे.

यापूर्वी शासनाच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होती. परंतु शासनाने यामध्ये बदल केलेला आहे. तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांची नावे यांची यादी पंचनामा अनुसार शासनाकडे पाठवलेले असून, शासन परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा करणार आहे.

याकरिता शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करून विकी क्रमांक म्हणजे विशिष्ट क्रमांक जो आपल्याला त्याकडून प्राप्त होईल त्यावरून कुठल्याही आपल्या सरकार केंद्रावरून आपले नाव व रक्कम शोधण्यास मदत होणार आहे. त्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांना पाहता येणार

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमची अनुदानाची रक्कम पाहण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड ऍक्टिव्ह करणे गरजेचे आहे. आपले आधार कार्ड जर इन ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याकरिता तुम्हाला आधार कार्ड ऍक्टिव्ह करून घ्यावे लागणार आहे.

तसेच आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक करणे गरजेचे असणार आहे. याप्रमाणे कारवाई पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांनी आपल्या वकृत ऍक्टिव्ह आधार कार्ड व बँक पासबुक करून घेऊन तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक घेऊन ही केवायसी पूर्ण केल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ ते पंधरा दिवसाच्या आत अनुदानाच्या रक्कम जमा होणार असल्याचे तहसीलदार यांनी माहिती दिली आहे. जुलै 2022 च्या पंचमहामानुसार शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली असून त्यांना मदत दिली जाणार आहे.

सातबारा मध्ये जास्त नावे असल्यास काय करावे

जर तुमच्या सातबारावर एकापेक्षा जास्त खातेदार असतील तर त्याची अनुदानाची रक्कम कोणत्या तरी एकाच खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्याकरिता सात दिवसाच्या संमती पत्र सर्वांच्या सईनुसार, ज्याच्या एकाच्या नावावर रक्कम द्यायचे आहे.

त्याचे नाव ना हरकत संबंधित प्रमाणपत्र तलाठ्यांकडे सादर करावे लागणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून अनुदान खात्यात जमा करून घ्यावी अशी आव्हान तहसीलदार यांनी दिली आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *