Farmers Loan : सन 2017 मध्ये तत्कालीन भाजप शिवसेना सरकारच्या काळात जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना अंतर्गत 13000 शेतकरी लाभापासून वंचित आहेत.
या मुद्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेलारा तालुक्यातील अडगाव येथील शेतकरी अन्याय निवारण कृती समितीने नुकतेच अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहे तत्कालीन राज्य सरकारने 28 जून 2017 रोजी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती मात्र यात निकष व अटींचा.
भरणा असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता त्यामुळे शासनाला रोज नवीन आदेश जारी करावी लागत होते दरम्यान अद्यापही जिल्ह्यातील 13 हजार 34 शेतकरी कर्जापासून वंचित आहेत यात आडगाव येथील केंद्रीय कृषक सेवा सहकारी सोसायटीचे 2४७ पात्र सभासद शेतकरी सुद्धा आजपर्यंत कर्ज माफी पासून वंचित आहेत.
तत्कालीन पालकमंत्री जिल्हाधिकारी कर्जमाफी झाल्याचे तेव्हा सांगितले होते यात कृषक संस्थेच्या २४७ पैकी चार शेतकऱ्यांना संपत्ती सत्कार ही करताना प्रमाणपत्र साठी चोळी कपडे देण्यात आले होते त्यांनाही देवळी येऊन गेली तरी अजून पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.
गेल्या सहा वर्षापासून कर्जमाफी नाही मिळाल्याने शेतकऱ्यांना संस्थेकडून मुलीचा दाखला मिळाला नाही त्यामुळे दुसरे कर्ज व इतर कोणत्याही लाभ शेतकऱ्यांना घेता आले नाहीत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.