Agriculture News | अवकाळी पावसाचा कहर सुरूच, या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

0
Agriculture News

Agriculture News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | बऱ्याच दिवसापासून राज्यावर अवकाळी पावसाची संकट आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तर काही भागांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी संत्रा कांदा शेती पूर्णपणे आडवा झालेला आहे. तर काही ठिकाणी झाडे पडली आहे. हळद पूर्णपणे भिजली शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे व शेतकरी वर्गामधून आता नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. Agriculture News

मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांचे काही ना काही कारणामुळे शेती पिकांचे उत्पन्नात नुकसान झालेले आहे. यामधून सावरत असताना शेतकऱ्यांनी ज्वारी, सोयाबीन भुईमुक्तीळ या पिकांची पेरणी केली होती. परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असली तरी उन्हाळी पिके काही ठिकाणी चांगलीच भरलेली आहेत. परंतु यातून थोडासा काय आधार मिळतात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट आले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांवर संकटाचे सावट पडले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टावर पूर्णपणे पाणी पेरले गेले आहे.

या पिकांची झाली अतोनात नुकसान

मंगळवारी अचानक झालेल्य अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा संत्रा या या फळबागांसह हलदी देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलेला दिसून येत आहे. शासनाने त्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

हिंगोली जिल्ह्यामधील सवणा, सवणा तांडा, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा, व सुरजखेडा या भागामध्ये हळद काढण्याचे काम सुरू आहे परंतु दोन वाट्यापासून अधून मधून येणारा अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे या पिकांची मोठे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे.

या झालेल्या अवकाळी पावसामुळे शिक्षकांच्या अतोनात नुकसान झालेले आहे लवकरात लवकर सरकारने नुकसान भरपाई देण्यात यावी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामातील आर्थिक मदती काही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे.

तसेच शेतकऱ्यांना वादळी वारे व अवकाळी पावसामुळे हिंगोली तालुक्यातील डिग्रीस परिसरातील अनेक शेती शिवारामध्ये उन्हाळी तिळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शासनाने नुकसानीचा पंचनामा करुन शेतकऱ्यांनी शंभर रुपये देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!