Indian Meteorological Department : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये येत्या काही तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. या आलेल्या संकटांमधून कसातरी शेतकरी सावरलेला आहे. तर डबल अवकाळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हैराऊन जाईल.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वेस्टन्र डिस्टर्बेस मुळे आठ जानेवारीला हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात गगाठा वाढणार आहे. हरियाणा, पंजाब, चंदिगड, दिल्ली, राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये आठ आणि नऊ जानेवारी दरम्यान मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
येत्या दोन दिवस वायू भारतावर दाट ते दाट धुके राहील. दक्षिण भारतातील वातावरण देखील बदल बदल दिसून येणार आहे. पुढील पाच दिवस तमिळनाडू आणि केरळमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. छत्रपती संभाजी नगर बुलढाणा जिल्ह्यात खामगाव परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसामुळे तूर, कांदा, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे.