SSC HSC Exam Twice : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी जाहीर केलेल्या आधी सुचना नुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. हा निर्णय 2026 पासून राज्यात येथे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2024 मधील बारावी व दहावी परीक्षा नेहमीप्रमाणे घेतले जातील असे जाहीर केलेले आहेत. 2025 च्या ही परीक्षा दरवळीच्या नियमितपने घेतल्या जातील अशी माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिलेली आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी एप्रिलमध्ये शालेय शिक्षण आराखड्याचा मसुदा प्रसिद्ध केला होता व त्यावर हरकत मागवण्यात आल्या होत्या त्यानंतर अंतिम योजना जाहीर करण्यात आलेली आहे नवीन योजनेनुसार या सर्व शिक्षण मंडळांनी भविष्यात सत्र प्रणाली लागू करणे अपेक्षित आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा एखादा विषयाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लगेच परीक्षा देता येईल या योजनेमध्ये नमूद केले आहे की हे केवळ एका परीक्षेच्या आधारे मूल्यांकन होण्याचा दबाव कमी करण्यासाठी मदत करणार आहे.
राज्यामध्ये वर्षाला दोनदा परीक्षा घ्यायची असतील तर त्यासाठी अगोदरच अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक राहील. याव्यतिरिक्त नवीन पाठ्यपुस्तके तयार करावे लागतील आणि त्या विद्यार्थ्यांना हे नवीन पाठ्यपुस्तके वितरित करावे लागतील ज्यांना आगामी परीक्षांसाठी सराव करण्यासाठी यांची आवश्यकता लागेल. हे नवीन बदल अमलात आणण्यासाठी प्रथम नववी आणि अकरावी इयत्ता मध्ये आणि नंतर दहावी आणि बारावी इयत्ता मध्ये त्यांची ओळख करून देण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे संबंधित सुधारणा करून या लागू करायच्या असल्यास 2025 पूर्व नवी आणि अकरावी इयत्ता मध्ये तो लागू केला जाईल आणि त्यानंतर 2016 मध्ये दहावी व बारावी इयत्ता साठी हा बदल लागू करणे शक्य होईल.