PM Kisan Yojana 16 installments : पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. परंतु पी एम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही पूर्ण नसेल त्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही हे लक्षात घ्या
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप नंबर 70571 47283 तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा
अकोला जिल्ह्यामधील 14 हजार 421 शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही पूर्ण नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या आगामी सोळाव्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ही केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
केंद्र सरकार द्वारे सुरू असलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. ही देशातील सीमांत तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारे सर्वात मोठी योजना आहे. या योजनेचा सोहळा वा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो
पी एम किसान योजनेच्या अंतर्गत या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जातात. पीएम किसान संकेतस्थळावर जाऊन लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधामुळे शेतकऱ्यांना कोणताही दलाल अथवा मध्यस्थी शिवाय एकही रुपया खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये सहभाग नोंदवता येतो.
यामुळे सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याची कटकट संपली आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातील ६ डिसेंबर २०२३ पर्यंत एक लाख 90 हजार 647 शेतकरी कुटुंबांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत सहभाग घेतला आहे.
त्यापैकी जमिनीचा तपशील अद्यावत करणे, बँक खाते आधार संलंगण करणे व ई केवायसी प्रमाणीकरण करणे याकरिता एकूण 14 हजार 421 ला वरती प्रलंबित आहेत. त्यामुळे जानेवारी 2024 मध्ये वितरित होणाऱ्या सोळाव्या हप्त्याच्या लाभांपासून संबंधित शेतकरी वंचित राहू शकतात. अशी शक्यता आहे.