रेशन कार्डधारकांना आता ही सेवा मिळणार आणखी काही दिवस मोफत!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card E-KYC | शिधापत्रिका (Ration Card) धारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ज्या नागरिकांची अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी शासनाने ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे. यामुळे लाखो गरजू रेशनकार्डधारकांना दिलासा मिळाला आहे.

30 एप्रिल होती शेवटची तारीख, पण…

पूर्वी ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र अद्याप अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने ई-केवायसीसाठी मुदतवाढ जाहीर केली आहे.Ration Card E-KYC

नाशिक जिल्ह्याचे आकडे काय सांगतात?

नाशिक जिल्ह्यात एकूण ३८ लाख ७३ हजार ३०५ शिधापत्रिका धारक आहेत. यापैकी आतापर्यंत ३० लाख ४२ हजार १०१ जणांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही ८ लाख ३१ हजार २०४ शिधापत्रिकाधारकांची प्रक्रिया बाकी आहे. जिल्ह्याच्या एकूण आकड्यांनुसार ७८ टक्के लोकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ई-केवायसी कशी कराल? ‘मेरा-केवायसी’ ॲपचा वापर करा

शासनाने ई-केवायसी प्रक्रियेसाठी ‘मेरा-केवायसी’ (Mera-KYC) हे खास ॲप तयार केले आहे. या ॲपवर OTPद्वारे लॉगिन करून आधार क्रमांक, ओटीपी व चेहरा ओळख (Face Verification) करणे आवश्यक आहे. हे सर्व टप्पे पूर्ण केल्यावरच तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण मानली जाईल.Ration Card E-KYC

शिधापत्रिकेवर धान्य हवे असेल, तर ई-केवायसी अनिवार्य

ज्या कुटुंबांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांना शिधापत्रिकेवर धान्य मिळणार नाही. त्यामुळे अंतिम मुदतीच्या आत, म्हणजेच ३० जून २०२५ पूर्वी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी केलं आहे.

Leave a Comment