Saturday

15-03-2025 Vol 19

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला; हवामानात मोठा बदल, राज्यातील ‘या’ जिल्ह्यामध्ये दोन डिसेंबर पर्यंत सुरू राहणार अवकाळी पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Duck new weather forecast : राज्यामध्ये 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. 25 नंबर 27 नोव्हेंबर पर्यंत राज्याचे विविध भागांमध्ये पावसान हजेरी लावली आहे. हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामान खात्याने 25 नोव्हेंबर पासून पाच साला सुरू होणार असा अंदाज दिला होता. त्यानुसार सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे.

दरम्यान आज हवामान विभागाने 29 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज दिला आहे. दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रात सुरू असलेला अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस थोडा फायदा ठरला आहे. तर द्राक्ष डाळिंबी यासारखा फळ पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा यापासून फायदा होणार आहे. तर काही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या पावसामुळे शेत पिंकांचे नुकसान करणारा ठरणार आहे.

अशातच विश्वासू ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी देखील पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहेm खरे तर हवामान खात्यासोबतच पंजाबराव देखील महाराष्ट्र 25 नोव्हेंबर पासून पावसाची शक्यता वर्तवली होती.

यानुसार सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे. यामुळे हवामान विभागाचा आणि पंजाबरावांचा हवामान अंदाज शेवळी खरा ठरला असल्याचे सांगितले जात आहे.

पंजाबराव दोन डिसेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडत जाणारा सांधा दिला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेला आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 28 नंबर एक डिसेंबर पर्यंत विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली.

या कालावधीत राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, अहमदनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर काही ठिकाणी दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची हजेरी पाहिले मिळू शकते. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहेत.

मात्र या कालावधीत पडणार पाऊस सर्व दूर पडणार नसून, तर काही ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

यामुळे अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता, शेतकरी बांधवांनी आपल्या शेत पिकांचे आणि पशुधनाची काळजी घ्यावी अशी आवाहन करण्यात आले आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *