Punjab Duck new weather forecast : राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी गारपिटीने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. अशाच शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे.
अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी व सर्व सामान्य नागरिकांसाठी पावसामध्ये अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना मान्सून काळात महाराष्ट्रभर बरसलेला पावसाचा मान्सून नंतर त्राही माम माजवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने रक्षा तांडव घातलेला आहे. 25 नंबर पासून सुरू झालेला पाऊस राज्यातील कोकण विदर्भ मराठवाडा महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असाच सर्वच विभागात कमी- अधिक प्रमाणात बरसला आहे.
काही भागात तर अक्षरश गारपीट झाली आहे. त्यामुळे झाले आहे प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये गारपीट झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
अशातच भारतीय हवामान विभागाने आज अर्थात 30 नोवेंबर 20 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. तसेच राज्यातील खानदेश विभागातील जळगाव मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान खात्याने या संबंधित जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. याशिवाय उर्वरित राज्यात काही भागात ढगाळ हवामान विधानसभा अगदी किरकोळ स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याशिवाय जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी देखील अवकाळी पावसा संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
पंजाबराव यांनी वृत्तवाहिनी संस्थेला दिलेल्या मुलाखतीत राज्यात दोन डिसेंबर पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी सांगितले की राज्यात पूर्व आणि पश्चिम विदर्भात एक डिसेंबर पर्यंत मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे.
या भागात अवकाळी पावसामुळे उघडे नाले भरून वातील असा अंदाज आहे तसेच राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील एक डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत उत्तर महाराष्ट्र गारपीट होणार नाही. फक्त पाऊस पडेल यामुळे तेथील शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे देखील सांगितले आहे. याशिवाय मराठवाड्यात दोन डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र मराठवाड्यात पावसाची तीव्रता या कालावधीमध्ये कमी राहिला असे त्यांनी नमूद केले आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस ?
राज्यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये एक डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यामधील काही भागात दोन डिसेंबर पर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावधान यांचा सल्ला यावेळी जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.