Pik Vima Update : राज्यातील काही जिल्ह्यांमधील पिक विमा भरण्यात आलेला होता. व रायगड जिल्ह्यांमध्ये पिक विमा हा सर्वात जास्तं शेतकऱ्यांनी भरला होता. या पिक विमामध्ये शेतकऱ्यांनी जी.जी पीक विम्यामध्ये लावली. त्या पिकांची नुकसान झाली होती. तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत.यामुळे, शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे आंदोलन केले.
महिला व बालविकास मंत्री ‘आदिती तटकरे’ यांच्या अध्यक्षतेखाली चालू असलेल्या, रायगड जिल्ह्यातील पिक विम्याची बैठक बसवून, सर्व कंपन्यातील पीक विम्यांचे अधिकारी यांना बोलवून ही बैठक पार पाडली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकरात, लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. व ते पैसे व्याजासहित द्यावे. अशी मागणी आदित्य तटकरे यांनी केली.
फळ पिक विम्याचे पैसे, जानेवारी महिन्यामध्ये व्याजासहित मिळतील.
रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पैसे हे व्याजासहित 3 जानेवारी 2024 च्या आत मध्ये सर्वांच्या बँक अकाउंट वर जमा होतील. अशी, माहिती कृषिमंत्री यांनी त्यांच्या माध्यमातून दिली आहे.
महसूल मंडळामध्ये जवळपास 7 हजार 500 शेतकऱ्यांनी आपला फळ पिक विमा हवामान आधारित काढलेला होता. असे, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यावेळी म्हटले आहे.
यामध्ये केवळ 3 हजार 500 शेतकऱ्यांनाच या फळ पिकविमा कंपनीकडून ही रक्कम अदा करण्यात आली होती. मात्र, काही शेतकऱ्यांना ही फळ पिक विम्याची रक्कम ही तांत्रिक मुद्द्यावरून देण्यात आली नाही.
ज्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे आंदोलन केले होते त्यावेळेस फळ पिक विम्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले होते. उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना 2940 शेतकऱ्यांना आतापर्यंत नऊ कोटी रुपयांची रक्कम आधार केलेली नाही ती आता त्यांना लवकरच मिळणारं आहे.
बाकी असलेल्या सर्व रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ पिक विमा हा लवकरच भेटणार असल्याची, माहिती कृषिमंत्री यांनी दिली आहे. व ही शेतकऱ्यांसाठी फारच आनंदाची बातमी आहे. हे माहिती कृषिमंत्री यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर दिलेली आहे.