Thursday

13-03-2025 Vol 19

Panjab Dakh : पंजाबराव यांचा हवामान अंदाज; या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh News : पंजाबराव यांचा नुकताच एक मोठा हवामान अंदाज समोर आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नक्कीच टेन्शन वाढणार आहे. कारण पंजाबराव यांच्या वरती शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे त्यामुळे. शेतकऱ्यांना पंजाबराव काय म्हणतात याकडे लक्ष लागलेल्या असते. पंजाबराव जे सांगतील ते सध्या घडत आहे. पंजाबराव जे सांगतील ते शेतकरी सध्या करत आहेत. त्यामुळे पंजाबराव काय म्हणतात याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं आहे चला तर जाणून घेऊया पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज. Panjab Dakh News

Panjab Dakh Havaman Andaj

पंजाबराव यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरती एक नवीन हवामान अंदाज प्रसार केलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 19 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजे राज्यात 19 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. परंतु हा पाऊस सर्व पडणार नाही भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी पंजाबराव यांनी राज्यात जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अकोला, अमरावती या भागात पाऊस परतणार आहे. तसेच राज्यात 19 ऑक्टोबरला जालना व आजूबाजूच्या परिसरामध्ये पाउस माघारी घेईल तसेच 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतणारा हवामान अंदाज दिला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांनी महाराष्ट्र मध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच चिंता वाढलेले आहे. त्यांच्या शेती पिकांची नुकसान होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये कापूस सोयाबीन यासारख्या पिकांची सध्या काढणी सुरू आहे.

मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी कापूस सध्या फुटलेला आहे. या पिकाची सध्या व्यसनी सुरू असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच फजिती होताना दिसत आहे हा कापूस भिजल्यावर शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसू त्यामुळे त्यांना बाजार भाव अपेक्षित मिळणार नाही. परंतु आता पंजाबराव यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांनी समजून घेऊन त्यांच्या पिकाचे व्यवस्थित नियोजन करायचे आहे.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Join what's group