Maharashtra Unseasonal Rain | दिवाळी संपत आलेली आहे आणि अशाच शेतकऱ्यांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हा मान्सून पाऊस आहे नसून अवकाळी पाऊस आहे. त्यामुळे हा पाऊस कुठे पडेल आणि शेतकऱ्यांचे किती नुकसान करायला सांगता येत नाही. सध्या राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी एक अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र खानदेश विदर्भ या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. खरे तर या भागात सध्या कापूस वेचणीची जोरात तयारी सुरू आहे अशातच हा पाऊस नक्कीच कापूस पिकाच नुकसान करणार आहे. Maharashtra Unseasonal Rain
या पार्श्वभूमी वरती नाशिक, रायगड, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सातारा, धुळे, नंदुरबार, रायगड, कोल्हापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात पावसाची शक्यता कशामुळे?
हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार, शनिवारी मध्यपूर्व अरबी समुद्रामध्ये 400 किमी अंतरावर कमी दाबाचा क्षेत्र तीव्र कमी दाब क्षेत्र रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. पाच दिवस त्याचे उत्तर ईशान्यकडील मार्ग क्रमांकाची शक्यता जाणवते.
राज्यात 26 तारखेनंतर चक्रीवादळ व 28 तारखेला तीव्र चक्रीवादळ रूपांतर होण्याची शक्यता असल्यामुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता निर्माण झाली आहे असं माणिकराव फुले यांनी सांगितलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे.