Saturday

15-03-2025 Vol 19

Drought In Maharashtra : दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळतील ‘या’ सवलती! वाचा ए टू झेड माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought declared : राज्यामध्ये सुमारे 42 तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळ परिस्थितीचा अहवाल कृषी विभागाने मंत्रालय स्तरावर दिलेला आहे या अहवालावर दुष्काळाची तीव्रता निश्चित केली जाणार आहे 42 तालुक्यांपैकी 40 तालुका मध्ये तीव्र दुष्काळ घोषित होण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

कृषी विभागाने दिलेल्या अहवाल नुसार दुष्काळाची तीव्रता निश्चित केली जाणार असून सुमारे 40 तालुके दुष्काळग्रस्त होण्याची शक्यता आहे यापैकी 24 तालुक्यांमध्ये तीव्र तर सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचा कृषी विभागामधील सूत्रांनी सांगितले आहे.

प्रधान पिक विमा योजनेचा निकाशानुसार सलग २१ दिवस पावसाचा खंड असलेल्या भागांमध्ये विमा कंपन्यांना नुकसान भरपाईच्या २१ टक्के रक्कम देण्याची सूचना कृषी आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावरील सर्वेक्षण करण्यात आले आहे.

त्यामध्ये 15 जिल्ह्यात 48 तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झालेला होता कृषी विभागाने विभागास्तरीय दुष्काळाची तीव्रता तपासणीची सूचना दिल्या होत्या त्या अहवाल गेल्या आठवड्यात प्राप्त झाला असून कृषी विभागाने अंतिम अहवाल मंत्रालयात पाठवलेला आहे त्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्यामधील 42 तालुक्यामध्ये दुष्काळ ?

राज्यामधील बिचेस तालुक्यामध्ये दुष्काळाची तीव्रता कृषी विभाग आणि तबसल्या आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जिल्हा आणि मुळशी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता सामान्य आलेले आहे त्यामुळे हे दोन तालुके वगळता उर्वरित चाळीस तालुक्यात दुष्काळाची तीव्रता घोषित होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्या सवलती मिळणार ?

  • जमीन महसूलात सूट
  • पीक कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू विज बीलात 33.5% सूट
  • शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही अंश शिथिलता
  • आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा ऑफर
  • त्यांचाही जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *