शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या निर्णयामुळे, कापसाला मिळणार 8,500 भाव ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate | महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ आणि खानदेश हे भाग मोठ्या प्रमाणावर कापूस पिकावर अवलंबून आहेत. कापूस लागवडी बाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो.याच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळतो का ? आपण जाणून घेणार आहोत.

(शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)

यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापुस बाजार भाव मध्ये सतत कमी होणारी घसरन पाहता शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे. सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदीला चालना मिळणार आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार अशी अशा व्यक्त होत आहे.

अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, गुलाबी बोंड आळी, यासारख्या भिन्न कारणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट दिसून येते. यासारख्या संकटांना तोंड शेतकऱ्यांनी त्यांचे पिकवले. परंतु आता या मालाला योग्य भाव मिळतो का याकडे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

कापूस पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस पिकापासून दूर चाललेला दिसून येत आहे. या कारणामुळे महाराष्ट्राचे उत्पादन कमी होता ना दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी बाजारातील स्थिती वेगळी होती, त्यावेळी बाजारात पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळाला होता. गेल्या हंगामामध्ये कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नव्हता.

परंतु यंदाची परिस्थिती वेगळी आहे. यंदा मान्सून काळात ही पुरेसा पाऊस झाला नसल्याने उत्पादनामध्ये घट झाली आहे. आणि त्यामध्ये बाजारात कापसाला हमीभाव पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होऊ लागली आहे.

जसे की तुम्हाला ठाऊकच आहे किसी सीसीआयने राज्यात पण महासंघाला कापूस खरेदीसाठी सब एजंट म्हणजे नोडल संस्था म्हणून नियुक्त केले होते. मात्र पण महासंघ लाजूनी कापूस खरेदी सुरू केंद्र करता आले नाहीत. विविध कारणामुळे पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र सुरू करता येत नाहीत त्यामुळे आतापर्यंत महासंघाने निश्चित केलेली 30 खरेदी केंद्र सीसीआय सुरू करणार आहे सीसीआयने नुकताच याबाबत निर्णय घेतलेला आहे.

आता या निर्णयाकडे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. या निर्णयामुळे शेतमालाला योग्य भाव मिळतो का शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले सोनू त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद घेऊन येईल का हे पाण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!