Agricultural loan in india: महाराष्ट्र राज्य 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेली महाविकास आघाडीचे सरकार यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली, या योजनेचा उद्देश पात्रता शेतकऱ्यांना प्रोत्साहन पूर्ण अनुदान देणे हा आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा टप्प्याचा लाभ भरपूर शेतकऱ्यांना झाला परंतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही. सध्या जिल्ह्या स्तरावर या शेतकऱ्यांची माहिती जमा करण्याची प्रयत्न सुरू केले जात आहे.
27 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली होती. या योजनेद्वारे अल्पमुदतीच्या पीक कर्जाची सातत्याने परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 पर्यंतचे प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय जुलै 2022 मध्ये घेण्यात आला होता.
कारवाई करण्याचे आदेश
2017 -18, 2018-19, व 2019-20 या कालावधीमध्ये विचारात घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी ज्यांनी त्याची अल्पकालीन पीक कर्ज पूर्णपणे फेडली आहे. वरील तीन आर्थिक वर्षापैकी दोन आर्थिक वर्षांमध्ये जे शेतकरी कर्ज घेतात आणि त्यांचे पीक कर्ज वेळेवर परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
तांत्रिक कारणामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र निकष पूर्ण करतात त्यांना या योजनेचा लाभ न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या सदस्यांनी एकाच आर्थिक वर्षात दोन हंगामासाठी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
तसेच दोन हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षात करून हंगामासाठी निश्चित केलेली परतफेड तारखेला कर्जफेड केलेली असतानाही अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. अशा तांत्रिक कारणाने प्रोत्साहन अनुदान मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखात असल्याचे सहकारी विभागाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. Agricultural loan in india
हे पण वाचा: पीएम जन धन खात्यातील लोकांना 10,000 रुपये मिळत आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती.