Thursday

13-03-2025 Vol 19

महाराष्ट्रात अवकाळी पावसासह; या 25 जिल्ह्यामध्ये गारपीट ची शक्यता, वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather News Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या आठवड्यात पावसासह गारपीटीची देखील शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांसाठी व्यवस्थित खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान खात्याने काही जिल्ह्यांना आज इशारा देखील दिलेला आहे. Maharashtra Weather News Update

राज्यातील ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या हवामान अंदाज मध्ये राज्यात मुंबई कोकणात संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासमपक प्रमाण थंडीची शक्यता आहे. तसेच या आठवड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता देखील वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

राज्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी तुरळक व किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमी वरती नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, शेगाव, नगर, पुणे, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या जिल्ह्यांमध्ये गारपीट ची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 27 डिसेंबरला संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यालगतच्या परिसरामध्ये गारपीट ची शक्यता वर्तवली आहे.

यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या शेती पिकांचे व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचे आहे .कारण या काळामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. गारपिटीमुळे बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. तसेच कांदा, गहू, हरभरा, तूर यासारखे पिकांची मोठे नुकसान होऊ शकतात. गहू आणि हरभरा या पिकावरती रोगराई पसरू शकते.

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *