Vande Bharat Express : गेला काही वर्षांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस बाबत खास काही चर्चा पाहिला मिळत आहेत. कधी या गाडीची आधुनिक बाबत, तर कधी या गाडीचे महागडे तिकीट दर सारख्या कारणामुळे ही गाडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये म्हणजे अवघ्या चार वर्षाच्या काळात ही गाडी देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झालेली आहे.
सर्वात आधी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले होते. यानंतर टप्प्याटप्प्याने भारतीय रेल्वेने या गाडीचा विस्तार करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत देशातील जवळपास 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यात आलेली आहे.
ज्या ठिकाणी गाडी सुरू आहे. तेथील रेल्वे प्रवाशांना या गाडीला अभूत प्रतिसाद दाखवला आहे. यामुळेच रेल्वेला चांगलाच नफा मिळत आहे. या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित झालेला दिसून येत आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी झालेला आहे. त्यामुळे या गाडीला लोकप्रियता दिसून दिवस वाढतच चालली आहे. सर्वत्र या गाडीची मागणी देखील आता सुरू झालेली आहे.
लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघातील देखील ही गाडी धावली पाहिजे, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. वेगवेगळ्या भारतीय रेल्वे प्रवाशांनी देखील ही गाडी सुरू करण्यासाठी मागणी केली आहे. हेच कारण आहे की आता भारतीय रेल्वे मार्ग 24 पर्यंत जवळपास 75 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करू शकते. असं दावा केला जात आहे.
सध्या आपल्या राज्यातून सहा वंदे मातरम एक्सप्रेस सुरू आहेत. राधा आगामी काही महिन्यांमध्ये आणखी काही वंदे मातरम एक्सप्रेस मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे राज्यातील धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या लवकरच वाढेल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.
अशातच मात्र भारतीय रेल्वे ने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्याप्रमाणे विमानाचा प्रवास आहे. तसाच काही प्रवास आता वंदे भारत देखील घेता येणार आहे. आता विमान प्रवास सारखी सुविधा वंदे भारत एक्सप्रेस प्रवेशना देणार आहे.
विमानामध्ये ज्या प्रमुख सुविधा दिल्या जात आहेत. तसेच सुविधा वंदे भारत एक्सप्रेस मध्ये दिले जाणार असून, त्यासाठी एक विशेष प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहे. या पायलेट प्रोजेक्ट अंतर्गत सुरवातीच्या टप्प्यात देशातील सहा महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये या हायटेक सुविधा दिल्या जाणार आहेत .
काय सुविधा मिळणार ?
मीडिया रिपोर्ट नुसार परवासांचा प्रवास आधी तुलनेत आरामदायक सोपा आणि जलद बनवण्यासाठी आता वंदे भारत मध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामध्ये प्रवाशांना खाण्यापिण्याचे अनेक पर्याय मिळणार आहेत. प्रवाशांना कॅब सर्विस दिली जाणार आहे दिव्यांग प्रवासासाठी व्हीलचेअर सुविधा राहणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये आता विमानप्रमाणे प्रवाशांना त्यांचा आवडता चित्रपट किंवा इतर कार्यक्रम देखील पाहता येणार आहेत. आता वंदे भारतच्या प्रत्येक डब्यात हाउसकीपिंग चा एक स्टाफ राहणार आहे. आता प्रशाला तिकीट बुक करताना जेवणाची ऑर्डर देता येणार आहे. ही सुविधा सुरुवातीला देशातील सहा महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर पुरवली जाणार आहे.
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चेन्नई म्हैसूर रूट, चेन्नई तिरूनलवेली, चेन्नई कोइंबतूर, तिरुवंतपुरम, कासार गोड, चेन्नई विजयवाडा, या दक्षिण रेल्वे विभागाच्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर सुरुवातीच्या टप्प्यात या सुविधा पुरवल्या जाणार आहे. वास्तविक सुरुवातीला सहा रेल्वे मार्गाने सुविधा दिल्या जाणार आहेत. पण सध्या फक्त पाच मार्गाचं अंतिम झाले आहेत. सव्वा मार्ग निश्चित होणे अजून बाकी आहे.