PM KISHAN YOJNA : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी अनेक योजना राबवत असते. त्यातली च एक योजना म्हणजे पीएम किसान योजना या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मानधन मदत केली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये इतके मानधन दिले जाते. व या
योजनेचे तीन विभागणी केलेले आहेत दर चार महिन्याला सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जातात. असे तीन हप्ते मिळून शेतकऱ्याला वर्षाला आर्थिक मदत म्हणून सहा हजार रुपये दिले जातात .आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाले आहेत.
परंतु बरेच शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता जमा झाला नाही. शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची E-KYC न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जमा झाला नाही तर कशाप्रकारे तुम्ही केवायसी करू शकता ते खालील प्रमाणे असेल.
E-KYC करण्यासाठी इथे क्लिक करा
E- KYC कशी करावी ?
1)ऑनलाइन E-KYC करण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा लागणार आहे.
2) या अधिकृत वेबसाईटवर E-KYC पर्याय या दिले दिलेला आहे. दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
3) तुम्ही E-KYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर लिहिण्यासाठी एक जागा मिळेल . त्या दिलेल्या जागेवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल
4) त्यानंतर पी एम किसान सन्माननिधी ची लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणी मोबाईल क्रमांकावर OTP येईल. आलेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करा.
5) या संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर , तुमची केवायसी कम्प्लीट होईल. व यानंतर तुम्हाला पी एम किसान या योजनेचा हप्ताचा लाभ मिळेल.
निधी वितरणाची कार्यपद्धती-
या योजनेसाठी PM KISHAN योजनेनुसार खालील प्रमाणे लाभार्थ्याला लाभ मिळेल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटे या योजनेअंतर्गत पैसे जमा होतील.
- पहिला हप्ता – 2000 हजार रुपये
- दुसरा हप्ता – 2000 हजार रुपये
- तिसरा हप्ता -2000 हजार रुपये
अशाच नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा