Thursday

13-03-2025 Vol 19

आई वडिलांच्या नावावर शेती आहे तर, अशा शेतकऱ्यांना भेटेल 17 व्या हप्त्याचा लाभ जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM KISAN YOJANA | नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता भारत देशातील करोडो शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असतो. आणि अशातच 16 व्या हप्त्याचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीएम किसान च्या योजनेअंतर्गत सरकार देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत म्हणून देण्यात आलेले आहेत. आणि अशातच, आता आई-वडिलांच्या नावावर जर शेती आहे, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा या 17 व्या हप्त्याचा लाभ भेटेल तर जाणून घ्या.

भारत देशामधील करोडो शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा लाभ भेटत आहे. आणि या पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार आपल्या देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत ही करत असते. तुम्हाला यामध्ये सांगण्यात येते आहे की, 6 हजार रुपयांची ही आर्थिक मदत दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जात असते.

पीएम किसान या योजनेच्या प्रत्येक हप्त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हजार रुपये पाठवले जात असतात. अलीकडेच 28 फेब्रुवारी रोजी भारत देशाच्या सरकारने या पीएम किसान योजनेचा हा 16 वा हप्ता जारी केलेला होता. आता जाहीर झाल्यानंतर करोडो शेतकरी हे आनंदी झाले आहेत.

भारत देशातील अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, इतरांच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचा लाभ घेता येईल का ?

जर तुम्हाला या योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल, तर ही बातमी तुम्ही पूर्णपणे वाचा आणि या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे, तेच पीएम किसान या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि इतरांना या योजनेचा लाभ हा घेता येत नाही.

यामध्ये जर एखादा शेतकरी इतरांच्या जमिनीवरती शेती करत असेल किंवा केलेली असेल व भाडे तत्वावर जर घेतलेली जमिनीवर तो शेती करत असेल, तर तो या पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घेऊ शकत नाही.

तसेच यामध्ये जे शेतकरी आपल्या आई-वडिलांच्या नावावरच्या जमिनीवर शेती करत असतात, तर त्यांनाही या योजनेचा लाभ हा भेटणार नाही. आणि आपल्या भारत सरकारच्या या योजनेचा देशभरामध्ये अनेक शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतात यामुळे सरकार हा हप्ताही परत घेवु शकतात.

तर यामुळे तुम्हाला या परिस्थितीत सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गतच्या जमीन अभिलेख पडताळणीसाठी व ईकेवायसी करणे हे आवश्यक केले आहे. जर तुम्ही या दोन्ही गोष्ट पूर्ण जर केल्या नसतील, तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही व भेटणार नाही.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *