Thursday

13-03-2025 Vol 19

सावधान! राज्यातील या भागात होणार पुढील तीन दिवस जोरदार पाऊस, पंजाबराव डक यांचा अंदाज अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update News | राज्यातील हवामान अंदाज विषयी महत्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. उन्हाचा तडाका जाणवत आहे. तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा. याच दरम्यान पुढील तीन दिवस हवामान कसे राहील याबाबत ज्येष्ठ हवामान (Punjab Duck Weather Forecast) तज्ञ पंजाबराव डक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये 20 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा मुक्काम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. (Maharashtra Weather Update News)

राज्यातील या भागात होणारा अवकाळी पाऊस

खरंतर राज्याचा हवामानामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे याच बदलामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेली आहे अशातच पुन्हा एकदा पंजाबराव ढक यांनी हवामानाविषयी मोठे भाष्य केले आहे. पंजाबराव डोक्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाचा जोरकाम राहणार आहे त्यामुळे नागकांनी व शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या आव्हान करण्यात आलेले आहे.

तसेच राज्यामध्ये 20 एप्रिल पर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवलेली आहे राज्यातील कोकण विभागामध्ये 17 ते 20 एप्रिल पर्यंत पाऊस सुरू होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे.

शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन

खरंतर शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. कारण मध्यंतरी अचानक अचानक आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान केलेले आहे.

तसेच पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मराठवाडा विभागात देखील पोषक वातावरण तयार झाल्याचे सांगितले आहे. तसेच दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, नाशिक, बीड, हिंगोली, अहिल्यानगर, मुंबई, या भागामध्ये जास्तीत जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे डक म्हणाले आहे. तसेच दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये दिवसात तापमान देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी ऊन असताना घराबाहेर पडू नये प्रशासनाच्या वतीने देखील आव्हान करण्यात आलेले आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *