PunjabRao Dakh News : गेल्या आठ दिवसांपासून राज्यसह देशभरातील विविध राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र गेल्या महिन्यात सुरू झालेला हा अवकाळी पाऊस मोठा हाहाकार माजवत आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे, जोपासलेले शेतीतील पीक बोईसपाठ झालें आहे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी बांधव पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी पावसाबाबत महत्त्वाची सूचना दिली आहे.
डक यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आता दोन डिसेंबर पासून हवामान कोरडे राहणार आहे. 2 डिसेंबर पासून राज्यात सूर्य दर्शनाला सुरुवात होणार, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. म्हणजेच राज्यात आता मोठा पाऊस पडणार नाही.
जवळपास 2 डिसेंबर पासून ते 5 डिसेंबर पर्यंत राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. असा अंदाज त्यांनी वर्तवला असून आजपासून राज्यात सूर्य देवाचे आगमन होणारं आहे.
मात्रं असे असले, तरी 6 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यातील हवामानात बदल होण्याची दाट शक्यता आहे. 6 ते 8 डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान अंशत: ढगाळ राहील. आणि या कालावधीत काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.
या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही फक्त रिमझिम पाऊस पडेलं यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये असे पंजाबराव डक यांनी म्हटले.
राज्यातील लातूर, नांदेड, उदगीर, धर्माबाद, यवतमाळष अकोला, अमरावती या भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल.
मात्र राज्यात आता आगामी काही दिवस मोठा पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
एकंदरीत आज पासून राज्यातील हवामान कोरडे होईल असा अंदाज असल्याचे अवकाळी पावसामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना या निमित्ताने दिलासा मिळणार आहे.