बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताअतुर झाला होता. मान्सून काळामध्ये अपेक्षित असा पाऊस न झाल्यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे
सोयाबीन कापूस तूर या पिकांचे यावर्षी अपेक्षित असे उत्पादन झाले नाही. तसेच यावर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संकटामध्ये सापडला आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल हमीदरापेक्षा कमी भावाने विकावा लागत आहे
शेतकऱ्याचा माझा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परंतु तुर बाजारामध्ये चांगला भाव मिळत आहे. तुरीचा तोरा दिवसेंदिवस वाढत आहे. तुर उत्पादनामध्ये झालेली घट आणि वाढत चाललेली मागणी यामुळे बाजारभावामध्ये तेजी येत असल्याचे तज्ञांची म्हणणे आहे
मागच्या काळामध्ये तुरीला दहा हजार रुपयांपेक्षा कमी भाव मिळत होता. परंतु आता पुन्हा एकदा तुरीच्या भावामध्ये सुधारणा होऊन तुरीला चांगला दर मिळत आहे
हा तुरीचा भाव शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे वाढला आहे. म्हणजे तूर आता खुल्या बाजारातील बाजारभावात खरेदी करण्यात येणार असल्याने. या पार्श्वभूमीवर आता बाजारभावामध्ये सुधारणा होत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
2 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावामध्ये एका मोठ्या बाजार समितीमध्ये तूरीला सर्वात जास्त दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये तुरीला साडेदहा हजार रुपये इतका दर मिळाला आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.